क्रिकेट चाहत्यांना अशी वागणूक देण्याची ही कोणती पद्धत? RCB Stampede प्रकरणानंतर गौतम गंभीरचे जुने विधान चर्चेत

Gautam Gambhir old quote viral after RCB stampede : IPL 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू च्या विजयानंतर बंगळुरूमध्ये झालेल्या विजयोत्सवात चेंगराचेंगरी झाली आणि ११ क्रिकेटप्रेमींना आपला जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर आता गौतम गंभीरचं २०१४ मधील एक जुनं विधान पुन्हा चर्चेत आलं आहे.
RCB Stampede Outrage
RCB Stampede Outrage esakal
Updated on

RCB Parade Tragedy Sparks Debate : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला इंडियन प्रीमिअऱ लीगच्या १८व्या पर्वात पहिले जेतेपद पटकावता आले. १७ वर्षानंतर मिळालेल्या यशाचे सेलिब्रेशन जंगी करण्याची RCB ने तयारी केली होती. कर्नाटक सरकारही यात सहभागी झाले आणि खेळाडूंना घेण्यसाठी चक्क उप मुख्यमंत्री विमानतळावर पोहोचले. त्यानंतर विधान सौदा येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा पार पडला. पण, त्याचवेळी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली आणि ११ लोकांना जीव गमवावा लागला, तर पन्नासहून अधिक लोकं जखमी झाले. या घटनेनंतर RCB आणि विराट कोहली यांच्यावर टीका होत आहे. त्यातच आता भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ( Gautam Gambhir) याचे जुने विधान चर्चेत आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com