
मुंबई : मायदेशात पुढील ५० दिवसांनंतर सुरू होणारी महिला एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा जिंकून आयसीसी करंडकाचा दुष्काळ संपवण्याचा निर्धार आम्ही केला आहे, परंतु त्या अगोदर होणारी ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका आमची खरी ताकद स्पष्ट करणारी असेल, असे भारतीय महिला कर्णधार हरमनप्रीत कौरने सांगितले.