
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकवर शनिवारी झालेल्या इंडियन ओपन ॲथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राने सहा सुवर्णपदके जिंकत दमदार यश संपादन केले. त्यात ठाण्याच्या हर्ष राऊतने शंभर मीटरची शर्यत जिंकून वेगवान धावपटूचा मान मिळविला.
महिलांच्या शंभर मीटर शर्यतीत मुळची छत्रपती संभाजीनगरची मात्र, येथे रिलायन्सतर्फे धावणाऱ्या साक्षी चव्हाणने बाजी मारली. महाराष्ट्राच्या काही खेळाडूंनी आर्मी, रिलायन्स, जेएसडब्ल्यूचे प्रतिनिधित्व करताना यश संपादन केले.