

Gautam Gambhir | T20 World Cup 2026
Sakal
Gautam Gambhir accused of bringing politics into Indian cricket team: भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सुपर ८ गटात संघर्ष करताना दिसला.. गौतम गंभीरने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी घेतल्यानंतर अनेकदा त्याच्या कार्यशैलीवर टीका होताना दिसली आहे. विराट कोहली व रोहित शर्मा यांच्या निवृत्तीला गंभीरच कारणीभूत असल्याची चर्चा रंगली. वर्ल्ड कप स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयानंतर तर गौतमवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. पाकिस्तानचा माजी फलंदाज अहमद शहजाद याने विराट कोहलीची अनुपस्थिती भारतीय संघाला मारक ठरल्याचा दावा केला आहे आणि त्याने गंभीरवर टीका केली आहे.