
England vs India, 3rd Test at Lord's, London: लॉर्ड्स कसोटीत बरेच चढ उतार पाहायला मिळाले आणि हीच कसोटी क्रिकेटची खरी गंमत आहे. पहिल्या डावात दोन्ही संघांची बरोबरी झाल्यानंतर इंग्लंडचा दुसरा डाव १९२ धावांवर भारताने गुंडाळाले. हे लक्ष्य पार करताना दमछाक होईल, हे भारताला माहित होते आणि झाले तसेच. पण, रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) तळाच्या फलंदाजांना सोबतीला घेऊन शेवटपर्यंत मैदानवार उभा राहिला. मोहम्मद सिराज दुर्दैवी विकेटने त्याच्या मेहनतीवर पाणी फिरवले. पण, कर्णधार शुभमन गिलने ( Shubman Gill) संघाचे कौतुक केले.