

India vs England T20 Match: इंग्लंडने भारताविरुद्धच्या पाच ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेत पुनरागमन केले आहे. इंग्लंडने तिसरा सामना २६ धावांनी जिंकला. २०१७ पासून टीम इंडियाला राजकोटमध्ये झालेल्या ट्वेंटी-२० सामन्यात पराभव पत्करावा लागला. १७१ धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया फ्रंटसीटवर होती, परंतु शेवटच्या १२ चेंडूंत मॅच फिरकी आणि पराभवाची नामुष्की ओढावली. या पराभवानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर जोरदार टीका होत आहे. गौतमचे अति प्रयोग संघाला महागात पडल्याची चर्चा सुरू आहे.