IND vs ENG 5th Test: गौतम गंभीरने पाच खेळाडूंनी सर्व सामन्यांत खेळवले! तिघांना फक्त पाणी आणायला वापरले, कोण ते?

India vs England 5th Test Marathi Cricket News : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेच्या शेवटच्या सामन्यात भारताने चार बदल करून संघ उतरवला. संपूर्ण मालिकेत केवळ पाच खेळाडूंना सलग सर्व सामने खेळवण्यात आले, तर तीन खेळाडूंना एकही सामना खेळायची संधी देण्यात आली नाही.
India vs England 5th Test Marathi News
India vs England 5th Test Marathi Newsesakal
Updated on
Summary
  • इंग्लंडने पाचव्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला

  • शुभमन गिल सलग पाचव्या कसोटीत टॉस हरला, भारताच्या संघात चार बदल

  • या मालिकेत तीन खेळाडूंना गौतम गंभीरने एकही सामना खेळण्याची संधी दिली नाही

England vs India, 5th Test at London Marathi Live Cricket Score: भारत-इंग्लंड यांच्यातली निर्णायक कसोटी आजपासून दी ओव्हल येथे सुरू झाली आहे. बेन स्टोक्सने माघार घेतल्याने यजमान इंग्लंडची बाजू किंचित कमकुवत झाली असली तरी त्यांना हलक्यात घेण्याची चूक भारताला महागात पडू शकते. इंग्लंडचा संघ चार बदलांसह या कसोटीत खेळणार आहे, तर भारताच्या संघातही बदल झाले आहेत. मालिकेतील शेवटच्या कसोटीत भारताने चार बदल केले, परंतु या मालिकेत तीन खेळाडू हे बाकावर बसून राहिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com