

India vs Zimbabwe 2nd T20I
Sakal
भारतीय टी२० संघाने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पहिली टी२० मालिका जिंकली आहे. शनिवारी (२५ जुलै) भारताचा झिम्बाब्वेविरुद्ध टी२० मालिकेतील दुसरा सामना हरारेमध्ये झाला. हा सामना भारताने ९० धावांनी जिंकला. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतल्याने ही मालिकाही भारताने खिशात घातली. भारताने आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळताना टी२० मालिकेत व्हाईटवॉश स्वीकारला होता. मात्र यानंतर झिम्बाब्वेविरुद्ध भारताने चांगले पुनरागमन करत मालिका जिंकली आहे.
शनिवारी झालेल्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेसमोर २२० धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला १७.५ षटकात सर्वबाद १२९ धावाच करता आल्या. भारताकडून ६ गोलंदाजांनी विकेट्स घेतल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.