

2011 World Cup India Team
esakal
2 एप्रिल 2011 रोजी भारताने वानखेडेच्या मैदानात महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली 28 वर्षानंतर वनडे वर्ल्ड कप उचलला होता. नाणेफेक जिंकून श्रीलंकाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीलंकाने भारताला 275 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने हे लक्ष्य 48.2 षटकात पूर्ण केल. यात भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाबाद 91 धावा केल्या होत्या, तर गौतम गंभीरच्या 97 धावा होत्या. आज या ऐतिहासिक घटनेला 15 वर्ष पूर्ण झाले आहे. एवढ्या वर्षानंतर भारताचे हे सुपरस्टार खेळाडू सध्या काय करतात हा प्रश्न सगळ्यांना पडला असेल.