
India Women vs West Indies Women: काही दिवसांअगोदर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात व्हाईटवॉश स्वीकारावे लागलेल्या भारतीय महिला संघाची आजपासून (१५ डिसेंबर) वेस्ट इंडीजविरुद्ध टी-२० मालिका नवी मुंबईत सुरू होत आहे. यात प्रामुख्याने कर्णधार हरमनप्रीत कौरची प्रतिष्ठा पणास लागणार आहे.
हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने अपयश येत आहे. महिला ट्वेन्टी-२० स्पर्धेत साखळीतच आव्हान संपुष्टात आले होते. त्यानंतर मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध यश मिळवलेले असले तरी ऑस्ट्रेलियात दारुण अपयशाचा सामना करावा लागला होता.