India women vs Australia
sakal
Cricket
India women vs Australia: २० चेंडूंत सहा फलंदाज गमावले; भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत
Smriti Mandhana: कॅनबेरा, ता. १९: ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताच्या महिलांनी विजयाची संधी गमावली. शेफाली वर्माने सलामीवर ५७ धावा केल्या तर स्मृती मानधनाने ३१ धावांची पाठराखण केली; मात्र अंतिम षटकांत सात विकेट गमावल्यामुळे भारत १४४ धावांवर मर्यादित राहिला.
कॅनबेरा : विजयासाठी असलेल्या १६४ धावांच्या आव्हानासमोर तीन बाद १२६ अशी वाटचाल करणाऱ्या भारतीय महिलांनी पुढील २० चेंडूंत २३ धावा करताना सहा फलंदाज गमावले आणि तेथेच ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा टी-२० सामना गमावला. त्यामुळे यजमानांनी तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ बरोबरी साधली.

