आशिया कपची ट्रॉफी जिंकली, पण टीम इंडियाची ‘ही’ कमकुवत बाजू आली समोर; ५ सामन्यांत १३ झेल सोडले, मुझुमदार म्हणाले- सुधारण्यासाठी मेहनत सुरू
India Dropped 13 Catches in Asia Cup: आशिया करंडक जिंकल्यानंतरही भारतीय महिला क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षणावर प्रश्नचिन्ह. ५ सामन्यांत १३ झेल सोडल्याने सुधारणा करण्यावर अमोल मुझुमदारांचा भर.
दुबई : भारतीय महिला क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षणात सुधारणा व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी सांगितले.