India Tour to England: भारतीय संघात स्थित्यंतर होत आहे. रोहित शर्माने ( Rohit Sharma) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर निवड समिती प्रमुख अजित आगरकरचे काम सोपे झाले असे वाटत होते. पण, त्यातच विराट कोहलीनेही ( Virat Kohli) कसोटी क्रिकेट खेळण्याची इच्छा नसल्याचे व्यक्त केले होते. त्यामुळे त्यांची पंचायत झाली आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, अजित आगरकर व संघ व्यवस्थापन यांना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या २०२५-२७ या हंगामाची तयारी करायची आहे. तोपर्यंत रोहित ३९ व विराट ३८ वर्षांचे होतील आणि त्यासाठीच टीम इंडियात नव्या दमाच्या युवा खेळाडूंना संधी देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण, आता कसोटी संघात कोणाला संधी द्यावी, हा पेच पडला आहे.