BCCI dismisses rumours about replacing Suryakumar Yadav
esakal
Shreyas Iyer Sanju Samson Hardik Pandya captaincy debate: सूर्यकुमार यादव, भारताच्या ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार बनल्यापासून त्याच्या वैयक्तिक कामगिरीचा आलेख खालावला आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या कर्णधार बदलाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. श्रेयस अय्यर, संजू सॅमसन व हार्दिक पांड्या यांचे ट्वेंटी-२० संघाच्या नव्या कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. सूर्यकुमारकडून ही जबाबदारी काढून घेतल्या जाण्याच्या चर्चा, गेल्या आठवडाभर सुरू आहेत. विविध मीडियाने वेगवेगळ्या खेळाडूची कर्णधार म्हणून निवड होईल, अशा बातम्या सुरू केल्या. पण, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) अखेर या वृत्तांवर मौन सोडले आहे.