
Ranji Trophy 2025 QF Marathi Updates: सूर्यकुमार यादवला इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत फक्त २८ धावाच करता आल्या होत्या. त्यामुळेच रणजी क्रिकेट करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत तो मुंबईच्या संघात परतला आणि फॉर्म परत मिळवण्यासाठी त्याला इथेही संघर्ष करावा लागला आहे. सर्वाधिक ४२ वेळा विजेता ठरलेल्या अन् गतविजेते असलेल्या मुंबई संघासमोर हरियाना संघाचे आव्हान आहे. कोलकाताच्या इडन गार्डवर सुरू असलेल्या या सामन्याच्या पहिल्या सत्रात हरियानाने बाजी मारलेली दिसतेय. मुंबईचे ४ फलंदाज त्यांनी २९ धावांत माघारी पाठवले आहेत आणि त्यात सूर्याच्या विकेटचा समावेश आहे.