

Mumbai vs Vidarbha Ranji Trophy Semi Final : मुंबई विरुद्ध विदर्भ यांच्यातला रणजी करंडक स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामन्याने अचानक कलाटणी घेतली आहे. विदर्भच्या पहिल्या डावातील ३८३ धावांच्या प्रत्युत्तरात मुंबईने चांगली सुरुवात केली होती, परंतु पार्थ रेखाडेने ( Parth Rekhade ) सामना फिरवला. त्याने त्याच्या एका षटकात कर्णधार अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव शिवम दुबे यांना माघारी पाठवले आणि त्यानंतर त्यांना आणखी एक धक्का बसला. १२ चेंडूंत मुंबईला ४ धक्के देऊन विदर्भने सामन्यावर मजबूत पकड घेतली आहे.