लंडन : आजच्या शेवटच्या दिवशी आम्ही एकच योजना आखली होती की इंग्लंडच्या फलंदाजांना सहजी मोठे फटके मारून द्यायचे नाहीत. जितके चेंडू त्यांना खेळावे लागतील तेवढी आमची विजयाची शक्यता वाढेल, याची आम्हाला खात्री होती..जेव्हा अशी परिस्थिती असते, तेव्हा फलंदाजी करणाऱ्या संघावर दडपण जास्त असते, कारण एक चेंडू बाद व्हायला पुरतो. त्याच दडपणाखाली ते खचून बाद झाले. अशा शब्दात भारतीय कर्णधार शुभमन गिलने भारताच्या विजयाचे विश्लेषण केले..गिलने सिराजचे कौतुक केले. तो म्हणाला, सिराजबद्दल बोलावे तितके कमी आहे. त्याला संघात किती मान आहे, याची तुम्हाला कल्पना येणार नाही. संघाला गरज असताना मलाही योग्य धावा काढता आल्या याचे समाधान आहे..Mohammed Siraj: अशक्य ते शक्य करणारा अविस्मरणीय विजय सिराजची कमाल; ५३ चेंडू अन्, ५६ मिनिटांचा थरार भारताने जिंकला, मालिका बरोबरीत.मालिका सुरू होताना सगळे जण वेगळा विचार करत होते आणि आम्ही वेगळा विचार करत होतो. गौतम भाईंनी सगळ्यांना आपला संघ ‘गन टीम’ आहे, असे बजावले होते. तसाच खेळ आम्ही करून दाखवला आहे. कप्तान म्हणून मी बरेच काही शिकलो आहे. काय सुधारणा करायला हव्यात, याचा अंदाज मला आला आहे, असे गिल म्हणाला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.