
भारत आणि इंग्लंड संघांतील कसोटी मालिकेतील तिसरा सामना क्रिकेटच्या पंढरीत लॉर्ड्सवर गुरुवारपासून (१० जुलै) खेळवला जाणार आहे. हा सामन्यात दोन्ही संघ चुरशीने खेळतील अशी अपेक्षा सर्वांना आहे, कारण या मालिकेत सध्या १-१ अशी बरोबरी आहे.
त्यामुळे तिसरा सामना जिंकून मालिकेत वरचढ निर्माण करण्याची संधी दोन्ही संघांना असणार आहे. जो हा सामना जिंकेल, त्याला पुढील दोन सामन्यात मालिका विजयाची संधी असेल, अशात तिसरा सामना जिंकून पुढील दोन सामन्यांसाठी प्रतिस्पर्धी संघाला दबावात ठेवण्याच्या हेतूने दोन्ही संघ या सामन्यात उतरणार आहेत.