

Rohit Sharma, Ajit Agarkar press conference : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी आणि इंग्लंडविरुद्धच्या ३ वन डे सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा आज करण्यात आली. जसप्रीत बुमराहची उपलब्धता वगळल्यास संघात फार बदल होणार नाही. मुख्य प्रशिक्षक रोहित शर्मा आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन टीम इंडियाची घोषणा केली. पण, या परिषदेत कर्णधार रोहित काहीसा निराश दिसला. बीसीसीआयच्या नव्या नियमांची पत्रकारांनी जेव्हा विचारणा केली, तेव्हा तो काहीसा चिडला. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध सलग दोन कसोटी मालिका गमावल्यानंतर BCCI ने १० नियम आणल्याचे वृत्त आहे.