रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्यासाठी अजित आगरकरच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली गेली! गौतम गंभीर...

Why Rohit Sharma was removed as India captain? भारतीय क्रिकेटमधील एक मोठा वाद सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. रोहित शर्मा याला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार असूनही अचानक नेतृत्वातून हटवण्यात आलं, यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
Gautam Gambhir influence on Ajit Agarkar Rohit Sharma decision

Gautam Gambhir influence on Ajit Agarkar Rohit Sharma decision

esakal

Updated on

BCCI selection committee decision on Rohit Sharma explained: रोहित शर्माला २०२७ चा वर्ल्ड कप खेळायचा होता, मग त्याच्याकडून कर्णधारपद का काढून घेतलं गेलं? हा सवाल विचारला जातोय. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, त्यानंतर पुढील मालिकेसाठी संघाचा कर्णधारच बदलण्यात आला. २०२७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवड समिती व संघ व्यवस्थापनाला नव्याने सुरुवात करायची होती. पण, रोहितकडून नेतृत्वाची जबाबदारी काढून घेण्याचा निर्णय कठोर असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

रोहितला कर्णधारपदावरून मुक्त करण्याचा निर्णय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर ( Ajit Agarkar) याने जाहीर केला असला तरी त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवणारा कोणी दुसराच असल्याचा दावा भारताचा माजी फलंदाज मनोज तिवारी ( Manoj Tiwari) याने केला. त्याचा रोख मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) याच्याकडे होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com