Dear 12th Man Army! RCB चे ८४ दिवसांनी चाहत्यांच्या हृदयाला भिडणारे भावनिक पत्र; बंगळुरू चेंगराचेंगरीनंतर प्रथमच झाले व्यक्त...

RCB Launches ‘RCB Cares’ Platform: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने तब्बल ८४ दिवसांनी सोशल मीडियावर पुनरागमन केले आणि चाहत्यांच्या हृदयाला भिडणारे भावनिक पत्र लिहिले. ४ जून रोजी झालेल्या बेंगळुरू चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर RCB ने सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट केली नव्हती.
Royal Challengers Bengaluru Breaks Silence After 84 Days
Royal Challengers Bengaluru Breaks Silence After 84 Daysesakal
Updated on
Summary
  • आरसीबीने आयपीएल २०२५ चे विजेतेपद जिंकून बंगळुरूत विजयी मिरवणूक काढली.

  • मिरवणुकीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू व ५० हून अधिक जखमी झाले.

  • घटनेनंतर आरसीबीवर टीकेची झोड उठली आणि त्यांना जबाबदार धरले गेले.

RCB emotional tribute letter to 12th Man Army : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ चं विजेतेपद मिळवल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने घरच्या चाहत्यांसाठई बंगळुरूत विजयी मिरवणूक आयोजित केली होती. मात्र, या मिरवणुकीदरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली आणि यात ११ जणांचा मृत्यू तर ५० पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर अनेकांनी आरसीबीच्या संघाला यासाठी जबाबदार धरलं होतं. चहुबाजुंनी त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. त्यानंतर आरसीबीने या घटनेतील मृतांच्या कुटंबियांना आर्थिक मदतीचीही घोषणा केली होती. आज जवळपास ८४ दिवसानंतर RCB सोशल मीडियावर व्यक्त झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com