
सुनंदन लेले
लंडन : भारतीय संघाने ओव्हल मैदानावर अशक्य ते शक्य करून दाखवले आहे. इंग्लंड संघाचे उरलेले चार फलंदाज बाद करून संपूर्ण डाव ३६७ धावांवर संपवण्यात यश आले. अविश्वसनीय असा सहा धावांनी विजय संपादन करता आला आहे. म्हणूनच ५३ चेंडू आणि अवघा ५६ मिनिटांचा पाचव्या कसोटी सामन्यातील थरार क्रिकेटमधला सर्वात जास्त आनंद देणारा ठरला.