

VAIBHAV SOORYAVANSHI
esakal
VAIBHAV SOORYAVANSHI SHARES EMOTIONAL REACTION AFTER WINNING PLAYER OF THE SERIES: भारतीय संघात निवड झाल्यापासून थेट मालिकावीर आणि सामनावीर पुरस्कार जिंकणाऱ्या वैभव सूर्यवंशीने(VAIBHAV SOORYAVANSHI) आता आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात झालेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने ३-० अशी एकतर्फी मालिका जिंकली.
या मालिकेत १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्याने तीन सामन्यांत १५१ धावा केल्या. दोन अर्धशतकं झळकावली आणि तिसऱ्या सामन्यात ४९ चेंडूत ८१ धावांची शानदार खेळी करत सामनावीर ठरला. त्याच्या या दमदार कामगिरीमुळे त्याला मालिकावीर पुरस्कारही मिळाला.