
भारताचा माजी क्रिकेटपटू विराट कोहलीने सोमवारी (१२ मे) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. १४ वर्षांच्या कारकिर्दीला अलविदा करत असल्याची सोशल मीडिया पोस्ट त्याने केली. त्यानंतर क्रिकेटविश्वातून त्याच्या निवृत्तीवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
आजी-माजी क्रिकेटपटूंसह अनेक चाहत्यांनीही त्याने लवकर निवृत्ती घेतल्याचे म्हटले. त्याने आणखी काही काळ खेळायला हवं होतं, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.