
Australia vs India Test Series: मेलबर्न कसोटी सामना हातातून गमावल्यावर बरेच प्रश्न उपस्थित झाले. बुमरा भन्नाट मारा करतो आहे, पण त्याला म्हणावी तशी साथ मिळत नाही. काही फलंदाज जम बसल्यावर आपली विकेट बहाल करत आहेत आणि संघाला गरज असताना वारंवार अपयशी ठरत असलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना वेगळा न्याय का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
मेलबर्नहून सकाळी ११ च्या विमानाने भारतीय संघ सिडनीला येऊन पोहोचला. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला भारतीय संघ विश्रांती घेणार असल्याचे समजले. मेबलर्न कसोटीनंतर तीनच दिवसात शेवटचा कसोटी सामना होणार आहे. पूर्ण विश्रांती घेऊन मगच एक दिवसाचा सराव करण्याचा विचार संघ व्यवस्थापनाने पक्का केला.