Rohit Sharma | Virat Kohli
esakal
What will happen to ODI cricket after Rohit virat retirement? पुढील वर्षी म्हणजेच २०२७ मध्ये वन डे वर्ल्ड कप स्पर्धा झाली आणि महान फलंदाज विराट कोहली व रोहित शर्मा निवृत्त झाले तर वन डे क्रिकेटच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहील, असे मत माजी फिरकी गोलंदाज आर. अश्विनने ( R Ashwin) व्यक्त केले आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळत असल्यामुळे विजय हजारे राष्ट्रीय वन डे क्रिकेट स्पर्धेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे; परंतु वाढत्या ट्वेंटी-२० लीग आणि कसोटी सामन्याचे महत्त्व अधोरेखित असताना ५०-५० षटकांचा हा प्रकार लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर गटांगळ्या खात आहे, असे अश्विनचे म्हणणे आहे.