Women’s Asia Cup 2026: टीम इंडिया जिंकली तर पुन्हा होणार ‘ट्रॉफी ड्रामा’? मोहसिन नकवी फायनलमध्ये येणार, गेल्या वर्षाची आठवण ताजी

INDIA MAY FACE TROPHY DRAMA AGAIN: भारतीय महिला संघाने आशिया कपमध्ये दमदार कामगिरी करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताने फायनल जिंकली आणि मोहसिन नकवी पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहिले, तर २०२५ प्रमाणे पुन्हा ‘ट्रॉफी ड्रामा’ पाहायला मिळणार का, याची उत्सुकता आहे.
Women’s Asia Cup 2026

Women’s Asia Cup 2026

esakal

Updated on

INDIA MAY FACE TROPHY DRAMA AGAIN: भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा मैदानात आमनेसामने येतात, तेव्हा सामना फक्त क्रिकेटपुरता मर्यादित राहत नाही. या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये मैदानाबाहेरही अनेकदा ड्रामा पाहायला मिळतो. आता पुन्हा एकदा असंच काहीसं घडण्याची शक्यता दिसत आहे.

भारतीय महिला संघ सध्या हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली आशिया कपमध्ये जबरदस्त प्रदर्शन करत आहे. भारताने ग्रुप स्टेजमधील आपले सुरुवातीचे तिन्ही सामने जिंकले आहेत. थायलंड, हाँगकाँग आणि पाकिस्तान या तिन्ही संघांना पराभूत करत भारताने सेमीफायनलमध्ये आपली जागा पक्की केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com