Ind vs Afg T20 : रोहित रिटायर्ड हर्ट की रिटायर्ड आऊट? सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानची झाली फसवणूक? जाणून घ्या नियम

India vs Afghanistan T20 Series News :
India vs Afghanistan, Super Overs Drama marathi news
India vs Afghanistan, Super Overs Drama marathi newssakal

India vs Afghanistan, Super Overs Drama : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेतील शेवटचा सामना जे काय घडलं त्याची कुणी कल्पना सुद्धा केली नव्हती. इतिहासात पहिल्यांदाच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुहेरी सुपर ओव्हरचा सामना खेळला गेला. हा इतिहास बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर लिहिला गेला, आणि करोड चाहते त्याचे साक्षीदार झाले. टीम इंडियाने अखेर हा सामना जिंकला पण त्यासोबतच एक वादही निर्माण झाला. अफगाणिस्तानची फसवणूक झाली का? दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये रोहित शर्माला फलंदाजीची संधी मिळायला हवी होती का?

India vs Afghanistan, Super Overs Drama marathi news
IND vs AFG 3rd T20I : शेवटच्या ओव्हरमध्ये 36 धावा ठोकून उडवल्या चिंधड्या! रोहित अन् रिंकुने जनतला दाखवले अस्मान

17 जानेवारी बुधवारी बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 212 धावा केल्या. रोहित शर्माने कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावले. अफगाणिस्ताननेही जोरदार प्रत्युत्तर देत शेवटच्या चेंडूवर धावसंख्या बरोबरीत आणली. यानंतर सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. येथे अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत 16 धावा केल्या. टीम इंडियासाठी रोहितसोबत यशस्वी जैस्वाल फलंदाजीला आली. यानंतर जे काही घडले त्यामुळेच खळबळ उडाली आहे.

सुपर ओव्हरमध्ये काय झाले?

रोहित आणि यशस्वीने सुपर ओव्हरच्या 5 चेंडूत 15 धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर भारताला २ धावांची गरज होती. अशा स्थितीत नॉन स्ट्राइकवर असलेल्या रोहितने अचानक निवृत्तीचा निर्णय घेतला आणि रिंकू सिंगला बोलावण्यात आले. रिंकू तंदुरुस्त असल्यामुळे 2 धावा आरामात पळेल यासाठी रोहितने हे केले असावे. मात्र, तसे झाले नाही आणि जैस्वाल-रिंकू केवळ 1 धाव घेऊ शकले. अशातच सुपर ओव्हरही टाय झाली.

आता नियमानुसार, आणखी एक सुपर ओव्हर होणार होती आणि यावेळी टीम इंडियाला प्रथम फलंदाजी करायची होती. यावेळी भारताकडून रिंकू सिंग फलंदाजीला आला मात्र पुन्हा रोहित शर्मा त्याच्यासोबत आला. रोहितने 3 चेंडूत 11 धावा केल्या पण पुढच्या 2 चेंडूत भारताने 2 विकेट गमावल्या. यानंतर रवी बिश्नोईने अवघ्या 1 धावात 2 बळी घेत टीम इंडियाला सामना जिंकून दिला. भारतीय संघाने सामना जिंकला पण रोहित शर्माला पुन्हा फलंदाजी का आला असा प्रश्न निर्माण झाला आहे.

India vs Afghanistan, Super Overs Drama marathi news
Virat Kohli Golden Duck : 15 वर्षांच्या T20I कारकिर्दीत किंग कोहलीची पहिल्यांदाच लाजिरवाणी कामगिरी.... अफगाणी पठाणांनी उडवला 'गोल्डन डक'

निवृत्तीसाठी काय आहेत नियम ?

खरे तर क्रिकेटच्या नियमांनुसार कोणताही फलंदाज दुखापतग्रस्त असल्यास तो डावाच्या मध्ये निवृत्त होऊ शकतो. फलंदाजाला 'रिटायर्ड हार्ट' मानले जाते. मग त्याची इच्छा असल्यास तो पुन्हा फलंदाजीला येऊ शकतो.

पण जर त्या फलंदाजाला कोणतीही दुखापत झाली नसेल तर आणि त्याने डाव अर्धवट सोडला तर त्याला पुन्हा फलंदाजी करण्याची परवानगी नसते. पण त्याला जर खेळायचे असेल तर ते विरोधी कर्णधाराच्या संमतीनेच केले जाऊ शकते, अन्यथा त्याला रिटायर्ड हार्ट समजले जाते.

आऊट झालेल्या फलंदाजाला पुन्हा सुपर ओव्हर मध्ये बॅटिंग मिळती का?

सुपर ओव्हरच्या नियमांनुसार, हे स्पष्ट आहे की जर एखादा फलंदाज सुपर ओव्हरमध्ये आऊट झाला तर तो दूसऱ्या सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करू शकत नाही. आणि एका सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी केल्यानंतर, तोच गोलंदाज पुढच्या सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करू शकत नाही.

जर आपण रोहितबद्दल बोलायचं झालं तर, त्याला कोणतीही दुखापत झाली नव्हती किंवा तो कोणत्याही प्रकारे आजारी नव्हता, तो फक्त निवृत्त दुखापती झाला होता, त्यामुळे तो पुन्हा फलंदाजीसाठी उतरू शकला.

India vs Afghanistan, Super Overs Drama marathi news
Ind vs Afg 3rd T20 : रोमांचक सामन्यात बिश्नोईच्या फिरकीत अडकला अफगाणिस्तान; डबल सुपर ओव्हरमध्ये भारताचा विजय

रोहित रिटायर्ड हर्ट झाला की रिटायर्ड आऊट ?

आता तो निवृत्त झाला होता का? याबाबत पंचांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. सामन्यानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सांगितले की, रोहित निवृत्त झाला आहे. आता जर प्रशिक्षक द्रविड म्हणत असतील की रोहित निवृत्त झाला तर त्याला पुन्हा फलंदाजीला का पाठवले? हे स्पष्टपणे क्रिकेटच्या नियमांचे उल्लंघन आहे.

याबाबत टीम इंडियाने अफगाणिस्तानच्या कर्णधाराशी चर्चा केली का? टीव्हीवर असे काहीही दिसले नाही आणि अफगाणिस्तानचे प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनी सामन्यानंतर पत्रकार परिषदेत या विषयावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अशी कोणतीही माहिती दिली नाही.

अशा स्थितीत पंचांसमोर प्रश्न पडतो की, त्यांच्याकडून एवढी मोठी चूक कशी झाली? पंचांनाही नियम आणि खेळण्याच्या परिस्थितीची माहिती नव्हती का? जर त्यांना याची माहिती नसेल तर त्यांच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होते. शेवटी कारण काहीही असले तरी अफगाणिस्तानची फसवणूक झाल्याचे दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com