
WTC 2023 : भारताचा दिग्गज खेळाडू थेट ICCला भिडला! या विधानाने WTC फायनलबाबत उडाली खळबळ
WTC Final Ind vs Aus Test : बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव केला. मात्र सामन्याचा शेवटचा दिवस संपण्यापूर्वीच भारताने अंतिम फेरीत जाण्याचे तिकीट पक्के केले होते. पहिल्या कसोटीत न्यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव करताच टीम इंडियाचे अंतिम फेरीचे तिकीट निश्चित झाले. आता एका माजी क्रिकेटपटूने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपवरच गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्या प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे. तो म्हणतो की, अंतिम सामना फक्त इंग्लंडमध्येच का होतो. आकाशने ट्विट केले की WTC फायनल फक्त इंग्लंडमध्येच का होते? सहमत आहे की हे तटस्थ ठिकाण आहे परंतु येथील परिस्थिती आशियाई खेळपट्ट्यांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे.
आकाश चोप्राने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याबाबतही मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. जागतिक कसोटी चॅम्पियन ठरवण्यासाठी एकच सामना का होतो, कसोटी मालिका का नाही? एक सामना घरच्या मैदानावर आणि एक सामना तटस्थ ठिकाणीही होऊ शकतो.
कसोटी क्रिकेट हा सर्वात आउट ऑफ द बॉक्स खेळ आहे, त्यामुळे त्याचा चॅम्पियन फक्त एका सामन्यातून मिळू शकत नाही. त्यासाठी किमान तीन सामन्यांची मालिका असली पाहिजे. टूर्नामेंटचा विजेता शोधण्यासाठी 2 वर्षे वाट पाहू शकत नाही.