दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने सामन्यावर आपली पकड अजून मजबूत केली. भारताने आपल्या दुसऱ्या डावात 255 धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडसमोर विजयासाठी 399 धावांचे आव्हान ठेवले. इंग्लंडने तिसऱ्या दिवस अखेर 1 बाद 67 धावा केल्या आहेत.
भारताकडून शुभमन गिलने शतक ठोकत तिसरा दिवस गाजवला. त्याने 104 धावांची खेळी करत भारताला मोठी आघाडी मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याला अक्षर पटेलने 45 धावा करत चांगली साथ दिली.
भारताने ठेवलेल्या 399 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने नाबाद अर्धशतकी मजल मारत जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र 28 धावांची खेळी करणाऱ्या बेन डकेटला अश्विनने बाद करत भारताला पहिलं यश मिळवून दिलं.
भारताने तिसऱ्या दिवशीच्या शेवटच्या सत्रात तीन विकेट्स गमावल्या. श्रीकार भारत 6 धावांवर तर कुलदीप यादव शुन्यावर बाद झाला. त्यानंतर अश्विन आणि बुमराहने 26 धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. मात्र हार्टलीने 26 चेंडूत शुन्य धावा करणाऱ्या बुमराहला बाद करत ही जोडी फोडली. रेहानने 29 धावा करणाऱ्या अश्विनला बाद करत भारताचा दुसरा डाव 255 धावांवर संपवला. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 399 धावांचे आव्हान ठेवले आहे.
चहापानानंतर खेळ सुरू होताच टीम इंडियाला आणखी दोन धक्के बसले. आधी श्रीकर भरत 28 चेंडूत सहा धावा करून बाद झाला. रेहान अहमदने त्याला बेन स्टोक्सकरवी झेलबाद केले. तर कुलदीप यादव खाते न उघडता बाद झाला. आता अश्विनसोबत जसप्रीत बुमराह क्रीजवर आहे.
भारताने दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी दुसरे सत्र संपले त्यावेळी भारताच्या 6 बाद 227 धावा झाल्या आहेत. भारताकडे सध्या 370 धावांची आघाडी आहे.
टॉम हार्टलीने भारताला 6 वा धक्का दिला. त्याने अक्षर पटेलला 45 धावांवर बाद केलं. अक्षर बाद झाला त्यावेळी भारताच्या दुसऱ्या डावात 6 बाद 220 धावा झाल्या आहेत. भारताकडे सध्या 363 धावांची आघाडी आहे.
अखेर शोएब बशीने शुभमन गिलला 104 धावांवर बाद करत 89 धावांची भागीदारी तोडली.
IND 396 & 209/4 (55.3) : शुबमन गिलने तिसऱ्या क्रमांकावर खेळताना आपलं पहिलं तर कसोटी क्रिकेटमधील तिसरं शतक ठोकलं. त्याने अक्षर सोबत नाबाद 80 धावांची भागीदारी रचत भारताची आघाडी 350 धावांच्या पार पोहचवली.
शुभमन गिल अन् अक्षर पटेल यांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचली. या जोडीमुळे भारताने आपली आघाडी 321 धावांपर्यंत पोहचवली. भारताच्या दुसऱ्या डावात सध्या 4 बाद 178 धावा झाल्या आहेत.
अखेर शुभमन गिलने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत मोठी खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने तिसऱ्या दिवशी लंचनंतर 300 धावांची आघाडी घेतली आहे.
दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत भारताने 4 गडी गमावून 130 धावा केल्या आहेत. तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात 30 षटके खेळली गेली, ज्यामध्ये भारताने 102 धावा जोडल्या. भारताच्या चार विकेट तिसऱ्या दिवशीच पडल्या आहे. भारताची एकूण आघाडी 273 धावांची झाली आहे.
पहिल्या डावात 32 धावा करणाऱ्या रजत पाटीदारला दुसऱ्या डावात केवळ 9 धावा करता आल्या. अशाप्रकारे पदार्पणातच त्याला दोन्ही डावात मिळून 50 धावाही करता आल्या नाहीत.
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने श्रेयस अय्यरचा अप्रतिम झेल घेतला आहे. तो टॉम हार्टलीच्या चेंडूवर 29 धावांवर झेलबाद झाला.
अखेर बऱ्याच दिवसांनी शुभमन गिलच्या बॅटमधून चांगली खेळी पाहायला मिळाली. ओपनिंग सोडून तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याचा निर्णय घेतल्यापासून तो सतत धावा काढण्यासाठी धडपडत होता. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावल्याने त्याचा आत्मविश्वास वाढेल.
शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी भारतीय डावाची धुरा सांभाळली आहे. टीम इंडियाची आघाडी 225 धावांची झाली आहे.
भारताची दुसरी विकेट 30 धावांवर पडली आहे. रोहितनंतर जेम्स अँडरसननेही यशस्वी जैस्वालला बाद केले आहे. त्याने 27 चेंडूत 17 धावा केल्या. आता श्रेयस गिलसोबत क्रीजवर आहे. या सामन्यात दोघांनाही मोठी खेळी खेळावी लागणार आहे.
तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारताला पहिला धक्का बसला. रोहित शर्मा 21 चेंडूत 13 धावा करून बाद झाला. जेम्स अँडरसनने त्याला क्लीन बोल्ड केले.
तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल क्रीजवर आहेत. या दोघांनाही आज मोठी खेळी खेळून टीम इंडियाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्याची इच्छा आहे. या सामन्यात टीम इंडिया इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य ठेवण्याचा प्रयत्न करेल.
हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात भारत मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. दुसरी कसोटी विशाखापट्टणम येथे खेळली जात आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दुसऱ्या डावात भारताची धावसंख्या 28/0 अशी आहे. भारताची एकूण आघाडी 170 धावांपेक्षा जास्त आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.