

Archery World Cup
esakal
Archery World Cup: रविवारी शांघाय येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषकाच्या दुसऱ्या टप्प्यात भारताच्या महिला रिकर्व्ह संघाने शानदार पुनरागमन करत सुवर्णपदक पटकावले. भारताच्या दीपिका कुमारी, अंकिता भकत आणि कुमकुम मोहोड या त्रिकुटाने यजमान चीनचा थरारक शूट-ऑफमध्ये पराभव करत ५-४ असा विजय मिळवला. निर्धारित वेळेत सामना ४-४ असा बरोबरीत राहिल्यानंतर टायब्रेकरमध्ये भारताने २८-२६ अशी बाजी मारत सुवर्णपदकावर नाव कोरले.