IND vs PAK : जिंकलो तरी पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यातील 'या' 5 चुका टाळण्याची आहे गरज

पाकिस्तानला 147 धावात रोखले होते. मात्र भारताची फलंदाजी पाकिस्तानच्या माऱ्यासमोर ढेपाळली. सामन्यात भारतीय संघाने केलेल्या या 5 चुका आगामी सामन्यात टाळणे गरजेचे आहे.
India Defeat Pakistan But 5 Mistakes Should Avoid In Asia Cup 2022
India Defeat Pakistan But 5 Mistakes Should Avoid In Asia Cup 2022 sakal

IND vs PAK Asia Cup 2022 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेड सामन्यात भारताचाने पाकिस्तानचा 5 विकेट्सनी पराभव केला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत पाकिस्तानला 147 धावात रोखले होते. मात्र भारताची फलंदाजी पाकिस्तानच्या माऱ्यासमोर ढेपाळली. अखेर हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजाने भारताचा डाव सावरत अखेरच्या षटकात सामना जिंकून दिला. जरी भारताने सामना जिंकला असला तरी 148 धावांचे माफक आव्हान पार करण्यासाठी भारताला 19.4 षटके खेळावी लागलीत तसेच पाच फलंदाज खर्ची घालावे लागले. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघाने केलेल्या या 5 चुका आगामी सामन्यात टाळणे गरजेचे आहे.

जिंकलो तरी पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यातील 'या' 5 चुका टाळण्याची होती गरज

सलामी जोडी - पाकिस्तानचे 148 धावांचे आव्हान पार करताना भारताला चांगल्या सुरूवातीची गरज होती. मात्र डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर केएल राहुल डकवर बोल्ड झाला. त्यानंतर रोहित शर्मा देखील चाचपत खेळत होता. त्याच्या जोडीला आलेला विराट कोहली वेगाने धावा करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र दुसऱ्या बाजूने त्याला रोहितकडून साथ मिळाली नाही. अखेर भारताचे अर्धशतक धावफलकावर लागले असताना रोहित 12 धावांवर बाद झाला.

कोहलीने धावा केल्या पण... - विराट कोहलीने पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात 34 चेंडूत 35 धावा केल्या. त्याने 3 चौकार आणि 1 षटकार देखील मारला. मात्र जुना विराट अजून कुठेतरी मिसिंग होता. तो पहिल्यापासूनच चापडत खेळत होता. अखेर फिरकीपटू मोहम्मद नवाजला षटकार मारण्याच्या नादात तो बाद झाला. भारताचा अव्वल फलंदाज फिरकी गोलंदाजाला बाद होतोय हे पचण्यासरखे नाही.

India Defeat Pakistan But 5 Mistakes Should Avoid In Asia Cup 2022
Ind vs Pak Asia Cup 2022 : हार्दिक पांड्याचा विजयी षटकार; भारताच्या विजयाची 5 कारणे

अखेरच्या षटकात अचूक मारा - भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानविरूद्ध चांगला मारा केला. भुवनेश्वर कुमारने 4 तर हार्दिक पांड्याने 3 विकेट घेतल्या. तर अर्शदीप सिंगने 2 विकेट घेतल्या. पाकिस्तानच्या 19 व्या षटकात 9 बाद 128 धावा झाल्या होत्या. मात्र पाकिस्तानचे तळातील फलंदाज शहानवाज दहानी आणि हारिस रौफ यांनी फटकेबाजी करत पाकिस्तानला 147 धावांपर्यंत पोहचवले. दहानीने 6 चेंडूत 16 तर हारिस रौफने 7 चेंडूत 13 धावांची आक्रमक खेळी केली.

मधल्या फळीत मोठी भागीदारी करण्यात अपयश - भारताचे पहिले तीन फलंदाज केएल राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहली संघाचे 53 धावात माघारी गेल्यानंतर भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांना भागीदारी रचण्याची गरज होती. मात्र सूर्यकुमार यादव 18 चेंडूत 18 धावा करून माघारी गेला. त्यामुळे भारतीय फलंदाजीवर दडपण आले.

India Defeat Pakistan But 5 Mistakes Should Avoid In Asia Cup 2022
Asia Cup : पंतच्या जागी दिनेश कार्तिकला का मिळाली संधी, जाणून घ्या 5 कारणे

एकच डावखुरा फलंदाज खेळवणे भोवले - भारताने आजच्या सामन्यात फक्त एक डावखुरा फलंदाज खेळवला. भारताकडे फक्त रविंद्र जडेजाच्या रूपाने एक डावखुरा फलंदाज होता. रोहित शर्माने ऋषभ पंतला आजच्या सामन्यात न खेळवता एक अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानकडे एक लेग स्पिनर (शादाब खान) आणि एक लेफ्ट आर्म स्पिनर (मोहम्मद नवाज) होता. त्यांच्याविरूद्ध अजून एक डावखुरा फलंदाज जास्त उपयुक्त ठरला असता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com