India vs West Indies T20 World Cup Match Preview
esakal
कोलकात्याहून मुंबईला जाण्याचे तिकीट कोण काढणार आणि घरी जाण्यासाठी कोण बॅगा भरणार, हे आजचा भारत वि. वेस्ट इंडीज सामना ठरवणार आहे. सामन्यात सरस खेळ करून विजय मिळणारा संघ मुंबईला रवाना होईल, तर पराभूत संघातील खेळाडू आपापल्या घरी जाण्याचा मार्ग पत्करतील. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात आज टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतील लढत सुपर-८ मधील असली तरी तिला उपउपांत्य फेरीचे महत्त्व प्राप्त झाले आहे.