
नवी दिल्ली : भारताच्या बॅडमिंटनपटूंनी जर्मनी येथील जागतिक विद्यापीठ स्पर्धेमधील मिश्र प्रकारात ब्राँझपदक पटकावले, मात्र या संघामध्ये निवडलेल्या १२ पैकी सहा खेळाडूंना या प्रतिष्ठेच्या स्पर्धेपासून दूर राहण्याची वेळ आली. व्यवस्थापनाच्या चुकीचा फटका सहा भारतीय खेळाडूंना बसल्याचा आरोप याप्रसंगी करण्यात आला आहे.