INDvsENG : 25 धावांसह डावानं जिंकत टीम इंडियानं गाठली फायनल

INDvsENG
INDvsENG

भारतीय संघाने चौथा आणि अखेरचा कसोटी सामना 25 धावा आणि एक डाव राखून जिंकला आहे. तिसऱ्या दिवशीच सामना संपवत टीम इंडियाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पहिल्या डावात 205 धावांत आटोपलेला इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात अवघ्या 135 धावांत आटोपला. अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांनी दुसऱ्या डावात प्रत्येकी 5-5 विकेट घेतल्या.

पंतचे शतक आणि वॉशिंग्टन सुंदरने अक्षर पटेलच्या साथीनं केलेली 165 धावांची भागीदारी याच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या डावात 365 धावांपर्यंत मजल मारली होती.  6 बाद 146 अशा संकटातून पंत-वॉशिंग्टन जोडीने भारताचा डाव सावरला. दुसऱ्या दिवसाअखेर भारताने पंतची विकेट गमावून 7 बाद 294 धावा केल्या होत्या.  

वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेलने तिसऱ्या दिवशी 7 बाद 294 धावांवरुन भारतीय संघाच्या डावाला सुरुवात केली. वॉशिंग्टन सुंदर 96 धावांवर खेळत असताना अक्षर पटेलच्या रुपात टीम इंडियाला आठवा धक्का बसला. अक्षर पटेल 43 धावांवर रन आउट झाला. त्यानंतर बेन स्टोक्सने ईशांत शर्मा आणि मोहम्मद सिराजला एकाच षटकात शून्यावर माघारी धाडत भारतीय संघाचा डाव 365 धावांत आटोपला. 

भारतीय संघाने घेतलेल्या आघाडीही इंग्लिश फलंदाजांना भेदता आली नाही. लॉरेन्स (50), कर्णधार ज्यो रुट (30), ओली पोप (15) आणि बेन फोक्स (13) यांच्याशिवाय अन्य कोणत्याही इंग्लिश फलंदाजाला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. परिणामी इंग्लंडचा दुसरा डाव 135 धावांत आटोपला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com