IND vs ENG : भारतीय फलंदाजांनी इंग्लिश गोलंदाजांचा घेतला समाचार; तिसऱ्याच दिवशी निकाल लावणार?

केएल राहुलचे शतक हुकले तर रविंद्र जडेजा शतकाच्या जवळ
IND vs ENG
IND vs ENGesakal

India Vs England 1st Test Day 2 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हा तिसऱ्या दिवशी संपण्याच्या मार्गावर आहे. भारताने दुसऱ्या दिवशी सहा विकेट्सच्या मोबदल्यात तब्बल 302 धावा ठोकून सामन्यावर पकड निर्माण केली आहे.

दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला त्यावेळी भारताच्या 7 बाद 427 धावा झाल्या असून भारताकडे आता 175 धावांची भक्कम आघाडी आहे. भारताकडून यशस्वी जयस्वल(80), केएल राहुल (86) आणि रविंद्र जडेजा (81*) यांनी मोठी अर्धशतकी खेळी केली. भारताच्या प्रत्येक जोडीने चांगली भागादीरी रचण्याचा प्रयत्न केला.

IND vs ENG
IND vs ENG 1st Test Day 2 : भारताची दुसऱ्या दिवशी 421 धावांपर्यंत मजल; दिवसअखेर भारताकडे भक्कम आघाडी

पहिले सत्र

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी 1 बाद 119 धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात केली. भारताने दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात 103 धावा केल्या. मात्र भारताचे दोन फलंदाज देखील बाद झाले.

पहिल्या दिवशी अर्धशतक ठोकणारा यशस्वी जयस्वाल 80 धावा करून बाद झाला तर शुभमन गिल 23 धावांवर बाद झाला.

दुसरे सत्र

पहिल्या सत्राप्रमाणे दुसऱ्या सत्रात देखील भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. गिल अन् जयस्वाल बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी चौथ्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी रचली. मात्र दुसऱ्या सत्राच्या सुरूवातीलाच अय्यर बाद झाला.

त्यानंतर रविंद्र जडेजा आणि केएल राहुल यांनी डाव पुढे नेत पाचव्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी रचली. राहुल शतकाच्या जवळ पोहचला होता. मात्र आक्रमक फटका मारण्याच्या नादात तो 86 धावांवर बाद झाला. यानंतर जडेजा आणि श्रीकार भारत यांनी भागीदारी रचण्यास सुरुवात केली.

IND vs ENG
Shubman Gill : माझी मदत केली आता गिलचीही कर... राहुल द्रविडने पिटरसनला असं काय सांगितलं होत?

तिसरे सत्र

तिसऱ्या सत्रात जडेजा आणि भारत यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना अजून थकवण्याचं काम केलं. त्यांनी सहाव्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी रचली. दरम्यान, जडेजाने आपले 20 वे कसोटी अर्धशतक ठोकले. त्याला साथ देणारा भरत देखील अर्धशतकाच्या जवळ पोहचला होता. मात्र रूटने त्याला 41 धावंवर बाद करत ही जोडी फोडली.

त्यानंतर आलेला अश्विन 1 धाव करून धावाबाद झाला. यानंतर जडेजाने अक्षर पटेलसोबत भारताची पहिल्या डावातील आघाडी 150 च्या पार पोहचवली. दिवस संपत असतानाच अक्षर आणि जडेजाने फटकेबाजी करत भारताला 421 धावांपर्यंत मजल मारून दिली. दिवस अखेर भारताला 175 धावांची भक्कम आघाडी मिळाली.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com