श्रेयस पाच वर्षांनंतर रणजीमध्ये ; इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी सराव

श्रेयस अय्यर आता उद्यापासून सुरू होणाऱ्या रणजी करंडक क्रिकेट ब गटातील आंध्रविरुद्धच्या लढतीत मुंबईचे प्रतिनिधित्व करेल.
श्रेयस पाच वर्षांनंतर रणजीमध्ये ; इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी सराव

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत अपयशी ठरलेला श्रेयस अय्यर आता उद्यापासून सुरू होणाऱ्या रणजी करंडक क्रिकेट ब गटातील आंध्रविरुद्धच्या लढतीत मुंबईचे प्रतिनिधित्व करेल. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी फलंदाजीचा सूर गवसण्यासाठी श्रेयस रणजी क्रिकेट खेळणार आहे. याआधी श्रेयसने २०१८मध्ये अखेरचा रणजी सामना खेळला होता. तब्बल पाच वर्षांनंतर तो देशातील अत्यंत मानाच्या स्पर्धेत सहभागी होणार आहे.

अजिंक्य रहाणे व चेतेश्‍वर पुजारा यांना भारताच्या कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. श्रेयस अय्यरकडे भरवशाचा फलंदाज म्हणून बघितले जात आहे. पण कसोटी क्रिकेटची सुरुवात शतकाने केल्यानंतर श्रेयसला फलंदाजीत मोठी झेप घेता आलेली नाही. कसोटीच्या पहिल्या १२ डावांत ५६.७२च्या सरासरीने ६२४ धावा फटकावल्यानंतर श्रेयसला पुढील आठ डावांमध्ये ११.८५च्या सरासरीने फक्त ८३ धावाच करता आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com