भारतीय संघाच्या पाकिस्तानवरील विजयावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले...

Team India and Raj Thackeray
Team India and Raj Thackeray

मुंबई - India Vs Pakistan T20 World Cup 2022 : भारताने शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5 विकेट्स राखून पराभव करत वर्ल्डकपची दमदार सुरूवात केली. या विजयामुळे भारतात आनंदोत्सव साजरा होत आहे. सर्व स्तरातून भारतीय खेळाडूंचं कौतुक होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील भारताच्या विजयावर प्रतिक्रिया दिली.

Team India and Raj Thackeray
Weather Update : मोठा दिलासा! पावसाचा परतीचा प्रवास अखेर संपला

राज ठाकरे म्हणाले की, पाकिस्तानच्या विरुद्ध भारताने आज मिळवलेला विजय हा अविस्मरणीय आहे ! भारतीय संघाने शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देत जो विजय मिळवला त्याला तोड नाही. येणाऱ्या सगळ्या सामन्यांसाठी भारतीय संघाला शुभेच्छा, असंही राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं.

आजच्या सामन्यात विराट कोहलीने 53 चेंडूत 83 धावा केल्या. त्याने हार्दिक पांड्याबरोबर पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत गेलेला सामना खेचून आणला. भारताला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 1 धावेची गरज असताना अश्विनने चौकार मारत सामना संपवला. या रोमहर्षक विजयाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

भारताच्या विजयानंतर पुण्यातही मध्यवर्ती भागात क्रिकेट चाहत्यांनी जलोष केला. गुडलक चौक आणि एफसी रोडवर मोठ्या प्रमाणात क्रिकेट चाहत्यांनी गर्दी केली होती. यावेळी पोलिस देखील क्रिकेट चाहत्यांसोबत थिरकताना दिसून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com