Ranji Trophy 2024 : मुंबईविरूद्धच्या सामन्यात बिहारच्या दोन प्लेईंग 11... सामना सुरू होण्यात झाला विलंब

Ranji Trophy 2024
Ranji Trophy 2024esakal

Ranji Trophy 2024 : अनेक वर्षानंतर बिहारचं होम ग्राऊंड मोइन उल हक स्टेडियमवर रणजी ट्रॉफीचा सामना होत आहे. विशेष म्हणजे रणजी ट्रॉफी इतिहासातील एक दमदार संघ मुंबईसोबतच बिहारचा सामना होत असल्याने सामन्याला एक वेगळच वलय निर्माण झालं आहे. मात्र बिहार क्रिकेट असोसिएशनच्या भोंगळ कारभारामुळे ही कसोटी एका वगेळ्याच कारणाने चर्चेत आली.

Ranji Trophy 2024
अवघ्या 7 धावांनी हुकले द्विशतक...! भारतीय निवडसमितीने दुर्लक्ष केलेल्या खेळाडूंची षटकार-चौकारची आतषबाजी

रणजी सामन्याच्या पहिल्या दिवशी बिहार आणि मुंबई यांच्यातील सामना उशिरा सुरू झाला. याचं कारण होतं बिहारनं दोन प्लेईंग 11 सादर केल्या होत्या. बिहार क्रिकेट असोसिएशनमध्ये दोन गट पडले असून मतभेद आणि भ्रष्टाचाराने पोखरल्याने ते भारतीय क्रिकेटपासून बराचकाळ दूर होते. बीसीसीआयने बिहार क्रिकेट असोसिएशनला निलंबित केलं होतं. मात्र अनेक दशकानंतर बिहारमध्ये क्रिकेट परतलं आहे. मात्र असोसिएशनची अवस्था सुंभ जळाला तरी पीळ जात नाही अशी आहे.

यावेळी बीसीए अध्यक्ष राकेश तिवारी आणि सचिव अमित कुमार यांच्यातील वादाचा फटका रणजी सामन्याला बसला. या दोघांनी मुंबईविरूद्धच्या सामन्यासाठी वेगवेगळ्या दोन संघांची निवड केली. त्यामुळेच सामना कोणासोबत खेळायचा याबाबत संभ्रम निर्माण झाला.

Ranji Trophy 2024
T20 World Cup : 'किती पैशांची गरज आहे ते सांगा....' IND vs PAK एकाच ग्रुपमध्ये पाहून 'या' क्रिकेट बोर्डाने ICC ला डिवचलं

अध्यक्ष, सचिव काय म्हणाले?

गेल्या काही वर्षापासून बिहार क्रिकेट असोसिएशनची प्रतिमा सुधारू लागली आहे. त्यात राकेश तिवारी आणि अमित यांच्यातील वादामुळे पुन्हा एकदा बिहार क्रिकेटवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. दरम्यान बीसीए प्रवक्ता संजीव कुमार मिश्रा यांनी राकेश तिवारी यांची बाजू घेत त्यांनी निवडलेली टीम योग्य असल्याचं सांगितलं.

अमित कुमार यांचा बिहार क्रिकेट असोसिएशनशी काही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं. यापूर्वीच बीसीएने अमित कुमार यांना निलंबित केलं आहे. त्यांच्या संघ निवडण्याला काही अर्थ नाहीये. दुसरीकडे अमित कुमार यांनी संघ निवडण्याचा अधिकार हा सचिवाचा असतो अध्यक्षाचा नाही असं सांगितलं. त्यांनी यासाठी बीसीसीआचे उदाहरण दिलं. ज्यावेळी भारतीय संघाची निवड होते त्यावेळी त्यावर शेवटची सही जय शहा यांची असते.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com