
भारताने पाकिस्तानचा शेवटच्या षटकात पराभव करत आशिया कपमधील आपला पहिला सामना जिंकला. हार्दिक पांड्याने 3 चेंडूत 6 धावांची गरज असताना षटकार मारून सामना संपवला. हार्दिकने फिनिशींग कामगिरीने सर्वाच्या मनावर राज्य केले. दरम्यान, रोहित शर्माने सामना संपल्यानंतर हार्दिकचे तोंडभरुन कौतुक केले.
भारताच्या विजयानंतर रोहित शर्माने आनंद व्यक्त केला. तसेच हार्दिकच्या खेळीवरही भाष्य केलं. जेव्हापासून हार्दिकने पुनरागमन केले आहे. तेव्हापासून त्याची कामगिरी धमाकेदार राहिली आहे. जेव्हा तो टीमा हिस्सा नव्हता. त्यावेळी त्याने गंभीरतेने विचार करत आपल्या फिटनेसवर अधिक लक्ष्य दिलं. आता तो 140+ वेगाने सहज गोलंदाजी करत आहे. त्याच्या फलंदाजीचा दर्जा आपल्या सर्वांना माहीत आहे. तो परत आल्यापासून खूप चांगली कामगिरी करताना दिसत आहे. तो आता खूप शांत झाला आहे आणि त्याला काय करायचे आहे याबद्दल अधिक आत्मविश्वास आहे, मग तो बॅटने असो वा चेंडूने.
तसेच, पांड्याने गोलंदाजीदेखील कमालीची केली. तो आता चांगली कामगिरी करत आहे. प्रति षटक 10 धावांच्या दबावाचा पाठलाग करताना तुम्ही घाबरू शकता परंतु त्याने ते कधीही दाखवले नाही. अशी प्रतिक्रिया हार्दिकच्या खेळीबद्दल रोहितने दिली
यासोबतच, विजयानंतर 35 वर्षीय रोहित शर्माने झालेल्या सामन्यावर भाष्य केलं. ' लक्ष्याच्या पाठलागादरम्यान, आम्हाला माहित होते की आम्ही कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकू शकतो. आमचा विश्वास होता आणि जेव्हा तुमचा विश्वास असेल तेव्हा या गोष्टी घडू शकतात. हे सहकारी खेळाडूंना स्पष्टता देण्याबद्दल आहे जेणेकरून त्यांना त्यांची भूमिका अधिक चांगल्या प्रकारे कळेल. संघाने गेल्या वर्षभरापासून खूप मोठी मजल मारली आहे आणि त्यांनी वेगवेगळ्या परिस्थितींशी जुळवून घेतले आहे. अशा शब्दात संघातील खेळाडूंचे रोहितने कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.