Rohit Sharma Ravi Shastri IND vs AUS : भारतीय संघाचे माती प्रशिक्षक रवी शास्त्रींनी भारतीय संघ इंदूर कसोटी हरल्यानंतर कडक शब्दात प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी भारतीय संघ अतीआत्मविश्वासामुळे हरला असे म्हणाले होते. यावर रोहित शर्माने चौथ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला कडक शब्दातच प्रतिक्रिया दिली. त्याने हे वक्तव्य मूर्खपणाचे असल्याचे सांगितले.
रवी शास्त्री यांनी स्टार स्पोर्ट्सवर समालोचन करताना भारताच्या पराभवावर वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले की, 'हा थोडा आत्मसंतुष्टपणा आणि अतिआत्मविश्वास चा परिणाम आहे. संघाने गोष्टी गृहीत धरल्या. तुम्ही निष्काळजीपणा केला त्यांनी तुम्हाला पराभूत केले.'
रोहित शर्माने गेल्या 18 महिन्यात रवी शास्त्रींवर बोलताना संयम बाळगला होता. मात्र त्याला रवी शास्त्रींनी तिसऱ्या कसोटीचे केलेले विश्लेषणाबाबत विचारण्यात आले त्यावेळी त्याने कडक शब्दांचा वापर केला. तो म्हणाला, 'खरं सांगू का ज्यावेळी तुम्ही दोन सामने जिंकता त्यावेळी बाहेरचे लोकं समजतात की आमच्यात अतिआत्मविश्वास निर्माण झाला आहे. हा पूर्णपणे मूर्खपणा आहे. आम्ही सर्व चारही सामन्यात आमचा सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करतो.'
रोहित शर्माने टीका करताना विराट कोहलीचाच कित्ता गिरवला. तो म्हणाला की, 'तुम्ही दोन सामने जिंकून थांबू शकत नाही. हे खूप साधं आहे. हे जे सर्व लोकं अतिआत्मविश्वासाबद्दल बोलत आहेत. जे या ड्रेसिंग रूमचा भाग नाहीयेत त्यांना माहिती नाही की ड्रेसिंग रूममध्ये काय चर्चा होते.'
हेही वाचा : परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.