India vs Pakistan T20 World Cup
esakal
टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव केला आहे. कोलंबो येथे झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला ६१ धावांनी धूळ चारली. या पराभवानंतर सर्व स्तरांतून पाकिस्तान क्रिकेट संघावर टीका होत आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज Shoaib Akhtar यानेही संघावर कठोर शब्दांत टीका केली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने पराभवावर प्रतिक्रिया व्यक्त केली.