श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील धरमशालाच्या मैदानात रंगलेला तिसरा आणि अखेरचा सामना जिंकत टीम इंडियानं (Team India) श्रीलंकेलाही व्हाइट वॉश दिला. भारतीय संघाला तिसरा सामना जिंकून देण्यात श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer ) मोलाचा वाटा उचलला. त्याने अखेरच्या टी-20 सामन्यात 73 धावांची नाबाद खेळी केली. या अर्धशतकी खेळीसह त्याने टीम इंडियाला धमाकेदार विजय तर मिळवून दिलाच याशिवाय त्याने किंग विराट कोहली (Virat Kohli) याचा विक्रमही मागे टाकला.
श्रेयस अय्यरने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 204 धावा काढल्या. यात त्याने 20 चौकार आणि 7 षटकार खेचले. विशेष म्हणजे जवळपास 170 च्या स्ट्राइक रेटनं धावा करणारा अय्यर मालिकेतील प्रत्येक सामन्यात नाबाद राहिला. टी-20 मध्ये तीन सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेत 200 हून अधिक धावा करणारा श्रेयस अय्यर हा एकमेव भारतीय फलंदाज आहे. याआधी विराट कोहलीच्या नावे 199 धावांचा रेकॉर्ड होता.
श्रेयस अय्यरसाठी श्रीलंका विरुद्धची मालिका खास राहिली. त्याने तिन्ही सामन्यात नाबाद अर्धशतक झळकावले. टी-20 मध्ये सलग तीन अर्धशतके झळकवणारा भारताचा तो चौथा खेळाडू ठरला. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी यापूर्वी असा पराक्रम करुन दाखवलाय. किंग कोहलीने सर्वाधिक तीन वेळा, लोकेश राहुलने दोनवेळा तर रोहित शर्माने एकदा सलग तीन अर्धशतक झळकावली आहेत. पण मालिकेत 200 + धावा करुन श्रेयस अय्यर या तिघांवर भारी पडलाय.
सलग तीन टी-20 सामन्यात अर्धशतकी खेळी करणारे भारतीय फलंदाज
विराट कोहली- 68, 79, 50 (2012)
विराट कोहली 72,77,66 (2014)
विराट कोहली 90,59,50 (2016)
रोहित शर्मा 89,56,97 (2018)
लोकेश राहुल 54, 56,57 (2020)
लोकेश राहुल 69,50,54 (2021)
श्रेयस अय्यर 57, 74, 73 (2022)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.