Rishabh Pant : 2023 च्या वर्ल्ड कपपूर्वी ऋषभ पंत टीम इंडियात परतणार? मोठी अपडेट आली समोर

Rishabh Pant
Rishabh Pantesakal
Updated on

Rishabh Pant Injury Update : टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. ऋषभ पंत गेल्या वर्षी कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. सध्या तो त्याच्या पुनर्वसनामुळे राष्ट्रीय क्रिकेट अकादमी मध्ये आहे. ऋषभ पंत टीम इंडियात कधी परतणार याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Rishabh Pant
MS Dhoni: तेरी मेहरबानीयां! धोनीने बायको अन् मित्रांसोबत नाही तर लाडक्या श्वानांसोबत केलं बड्डे सेलीब्रेशन

दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे संचालक श्याम शर्मा म्हणाले की, ऋषभ पंत बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सुरू असलेल्या पुनर्वसनाला पुरेसा प्रतिसाद देत आहे. यंदाचा एकदिवसीय विश्वचषक संपल्यानंतर भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज तंदुरुस्त घोषित होईल, अशी अपेक्षा केली जाऊ शकते.

बंगळुरूमधील एनसीएसमध्ये पंतला भेटल्यानंतर शर्मा यांनी आयएएनएसला सांगितले की, 'ऋषभ पंत चांगली प्रगती करत आहे. तो पुरेशी प्रतिक्रिया देत आहे. एकदिवसीय विश्वचषकानंतर तो बरा होऊ शकतो आणि तो पूर्णपणे तंदुरुस्त घोषित झाल्यानंतरच बाहेर पडेल.

Rishabh Pant
WI vs IND: कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी संघाची घोषणा! 'या' खेळाडूला मिळाली संधी

ऋषभ पंत दिल्लीहून त्याच्या गावी जात असताणा देहराडून जवळ 30 डिसेंबर 2022 रोजी पहाटे 5.30 वाजता अपघात झाला. या भयंकर अपघातात त्यांच्या गाडीला आग लागून, पंत गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर त्याला देहराडून येथील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दुखापत गंभीर असल्याने त्याला त्यानंतर त्याला विमानाने मुंबईला नेण्यात आले. त्यांच्यावर वर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या, नंतर तो मागच्या काही दिवसांपासून नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीमध्ये आहे.

एप्रिलपासून पंतचे एनसीएमध्ये पुनर्वसन सुरू आहे. शर्मा म्हणाले की, एनसीएमध्ये पायऱ्या चढून आणि माती तसेच गवतावर चालत पंतला त्याच्या पुनर्प्राप्तीमध्ये प्रगती करताना पाहून आनंद झाला. एनसीएमध्ये त्यांचे सुरू असलेले पुनर्वसन चांगले चालले आहे. तो खूप व्यायामही करत आहे. मी सुमारे अर्धा तास NCA मध्ये होतो.

फेब्रुवारी 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा पंत शेवटचा अ‍ॅक्शनमध्ये दिसला होता, जेव्हा भारताने डिसेंबर 2022 मध्ये बांगलादेशविरुद्ध 2-0 अशी कसोटी मालिका जिंकली होती. ऋषभ पंतने 2022 मध्ये टीम इंडियासाठी एकूण 7 कसोटी सामने खेळले. यादरम्यान त्याने 61.81 च्या सरासरीने 680 धावा केल्या. दुसरीकडे, पंतने गेल्या वर्षी भारतासाठी 12 एकदिवसीय सामन्यांमध्ये 37.33 च्या सरासरीने 336 धावा केल्या होत्या. टी-20 बद्दल बोलायचे झाले तर या फॉरमॅटमध्ये त्याने गेल्या वर्षी 25 सामने खेळताना 21.41 च्या सरासरीने केवळ 364 धावा केल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.