Breaking: विराट कोहलीचा RCB च्या कर्णधारपदाचाही राजीनामा!

Breaking: विराट कोहलीचा RCB च्या कर्णधारपदाचाही राजीनामा!
Summary

भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचीही नुकतंच केलं होतं जाहीर

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने काही दिवसांपूर्वीच भारताच्या टी२० संघाचा राजीनामा दिला. T20 World Cup नंतर विराट भारताच्या टी२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर आज विराटने आणखी एक मोठी घोषणा केली. IPL 2021 हे पर्व संपल्यानंतर विराट कोहली RCB म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या कर्णधार पदावरूनही दूर होणार असल्याचे विराटने स्पष्ट केले. विराटचा हा व्हिडीओ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या ट्वीटर हँडलवर पोस्ट करण्यात आला आहे.

"यंदाचे IPL हे माझे RCB चा कर्णधार म्हणून शेवटचे IPL असणार आहे. माझ्या शेवटच्या सामन्यापर्यंत मी RCB चा खेळाडू म्हणूनच खेळेन. पण कर्णधार म्हणून मी स्पर्धा संपल्यावर पदावरून पायउतार होणार आहे. मला पाठिंबा देणाऱ्या आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या माझ्या सर्व चाहत्यांचे मनापासून आभार", अशा भावना विराटने व्यक्त केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com