
शुभंकर तावडे आणि ऋतुजा बागवे
कधी कधी नात्यांना नावाची गरज नसते. त्या नात्यांची रेशीम गुंफण इतकी सहज आणि सच्ची असते, की ते नातं नुसत्या हास्यातून, गप्पांतून, आणि एकमेकांच्या सहवासातूनच समोर येतं. असंच एक रेशीमनातं आहे अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री ऋतुजा बागवे यांचं. ‘अंधारमाया’ या आगामी हॉरर सिरीजच्या निमित्तानं दोघंही एकत्र येत आहेत. ही सिरीज ३० मे रोजी ‘झी5’ वर प्रदर्शित होणार आहे. मालिकेमध्ये ते सहकलाकार असले, तरी प्रत्यक्षात त्यांच्यातली मैत्री ही काळाच्या परीक्षेत उतरलेली, घट्ट आणि प्रामाणिक आहे. थिएटरच्या पार्श्वभूमीतून आलेल्या या दोघांची ही मैत्री केवळ सहकार्यासाठी नाही, तर एकमेकांप्रती असलेल्या आदर, विश्वास आणि आपुलकीवर उभी आहे.