Best Women Qualities: आचार्य चाणाक्य एक महान अर्थशास्त्री आणि राजनीति तज्ज्ञ होते. चाणाक्य निती आजही जगभऱ्यात मानली जाते. नीति शास्त्रात नोकरी, व्यापार, नातेसंबंध आणि व्यक्तिगत जीवनासंबंधित अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. आचार्य चाणक्य यांनी नीति शास्त्रात महिलांबद्दलही सांगितले आहे. जाणून घेऊया त्या कोणत्या महिला आहेत ते.
शिक्षित महिला- आचार्य चाणक्य यांच्या मते, शिक्षित, संस्कारी आणि गुणवान महिला कोणत्याही व्यक्तीचं जीवन सफल करू शकते. अशा महिला आत्मविश्वासी असतात. या महिला मोठा निर्णय घेण्याआधी मागे बघत नाहीत. (Chanakya Niti)
मधूर वाणी - मधूर वाणी असलेल्या महिला जीवनात समृद्धी घेऊन येतात. अशा महिला घरातील वातावरण आनंदी ठेवतात. त्यामुळे घराची प्रतिष्ठा वाढते. अशा महिलांचा समाजात कायम सन्मान होतो.
मर्यादित इच्छा - काही महिला परिस्थितीनुसात त्यांच्या इच्छा सिमित ठेवतात. अशा महिला पुरुषांसाठी फार भाग्यशाली मानल्या जातात. अशा महिला वाईट परिस्थितीतही खंबीरपणे उभ्या राहातात. घरास योग्य मार्गावर घेऊन जाण्यात अशा महिलेचा मोलाचा वाटा असतो.
शांत स्वभाव - चाणाक्य नीतिनुसार शांत स्वभावाच्या महिला पुरुषांसोबत उत्तमरित्या संसार थाटतात. अशा महिला घरात सुख, समृद्धी आणि शांती घेऊन येतात.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.