Change These Habits : चाणक्यानीति शास्त्र लोकांना आयुष्यात सफल होण्यासाठी प्रेरित करत आहे. त्यांच्यानुसार जीवनात यशस्वी होण्यासाठी संघर्ष करावा लागतो. काही लोकांना यश मिळते तर कोणाला नाही. चाणक्यानीति शास्त्र यशस्वी जीवनासाठी कानमंत्र दिले आहेत.
समाज आणि लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक गोष्टी सूत्र स्वरूपात मांडल्या आहोत. त्यातच त्यांनी काही अशा सवयींचा उल्लेख केला आहे, ज्या माणसासाठी शत्रू सिध्द होतात आणि माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करतात. त्यामुळे या सवयी बदलणे आवश्यक असतात.
या सवयी बदला
चुकीच्या पध्दतीने पैसे कमवा
जे लोक चुकीच्या पध्दतीने पैसकमवतात त्यांच्याकडे फारकाळ पैसे टिकत नाही. त्यांच्या घरात एवढ्या समस्या असतात की, इच्छा असूनही त्याचे सुख घेऊ शकत नाही. त्यामुळे आयुष्य सुखाने जगायचे असेल तर पैसा मेहनत आणि इमानदारीने जगा.
आळस सोडा
जे लोक आळशी असतात आणि सतत अंथरूणावर पडलेले असतात त्यांचं नशिबपण झोपूनच राहतं. लक्ष्मीची अवकृपा होते. अशा लोकांना दारिद्र्याला सामोरं जावं लागतं.
खादाड वृत्ती
ज्यांचे मन सतत खाण्याकडे असतं, जे लोक कायम आवश्यकते पेक्षा जास्त खातात ते कायमच आजाराला निमंत्रण देतात. त्यांच्याकडे पैसा कधी टिकत नाही. त्यांच्याकडे कायमच पैशाची कमतरता असते. जे लोक दात घासत नाहीत त्यावर लक्ष्मीची अवकृपा होते. व दारिद्र्य येते.
कटू शब्द बोलणे
जे लोक आपल्या वाणीवर संयम न ठेवता कटू शब्द बोलतात. ते नाहमीच कोणाचे न कोणाचे मन दुखवतात. अशा लोकांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या येतात. त्यांच्याकडे पैसा टिकत नाही.
घरात अस्वच्छता
जे लोक आपले दात साफ करत नाहीत, जे घर स्वच्छ करत नाहीत त्यांना विविध रोगांनी ग्रासले जाते. पैसा वायफळ खर्चात जातो. लक्ष्मीला स्वच्छता प्रिय आहे, अशा लोकांकडे लक्ष्मी थांबत नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.