

Climate Change Is Disrupting Sleep in India, Raising Serious Health Risks: Report
sakal
हवामान बदलाचा विपरीत परिणाम हा भारतीयांच्या झोपेवरदेखील होऊ लागला असून याबाबत भारत एक जागतिक हॉटस्पॉट बनल्याचे 'क्लायमेंट सेंट्रल'च्या अहवालातून उघड झाले आहे. झोप कमी झाल्यामुळे त्याचा व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे हा अहवाल सांगतो. दक्षिणेकडील राज्यांतील लोक हे दरवर्षी ७८ ते ९१ तास झोप गमावत आहेत. केवळ हवामान बदलामुळे गमावलेल्या आठ ते नऊ तासांच्या झोपेचा यात समावेश आहे. जागतिक पातळीवर (२०२०-२०२५) रात्रीच्या उष्णतेमुळे व्यक्तीने दरवर्षी सरासरी सुमारे ५६ तासांची झोप गमावली आहे.