- सायली शिंदे, योगतज्ज्ञ
पावसाळा आला, की हवेत आर्द्रता वाढते, शरीराची पचनक्रिया मंदावते आणि सर्दी-खोकला, ताप, पोटाचे विकार असे आजार लवकर होतात. या ऋतूत रोगप्रतिकारशक्ती (इम्युनिटी) टिकवण्यासाठी योग्य योगाभ्यास, प्राणायाम आणि आहार पद्धती पाळली, तर आरोग्य उत्तम राहते.